Posts

Showing posts from May 8, 2020

देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Image
देशात कोरोना रिकव्हरी रेट 30 टक्क्यांजवळ, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. नवी दिल्ली, 9 मे:  देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊ...

मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं शरद पवार झाले व्यथित, ट्वीट करुन व्यक्त केलं दु:ख

Image
मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं शरद पवार झाले व्यथित, ट्वीट करुन व्यक्त केलं दु:ख कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत मुंबई, 8 मे:  देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून लॉकडाऊनमुळे बेरोजगार व्हावं लागलेल्या काही मजुरांनी पायीच घराची वाट धरली आहे. या संकटाच औरंगाबादजवळील करमाड येथे तब्बल 16 मजुरांना मालगाडीने चिरडलं. यात 16 मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहेत. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.', अस शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे. तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल...

मुंबईहून 1493 किमी पायी सुरू केला प्रवास, रस्त्यात अचानक आली चक्कर आणि...

Image
मुंबईहून 1493 किमी पायी सुरू केला प्रवास, रस्त्यात अचानक आली चक्कर आणि... मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे. मुंबई, 08 मे :  कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा 17 मेपर्यंत वाढवण्यात आला. यामुळं परराज्यांमध्ये अडकलेले मजूर आपल्या घरी जाण्यासाठी जमेल त्या मार्गानं प्रवास करत आहेत. काहींनी पायी प्रवास करत घर गाठलं तर काहींचा जीवनप्रवासच संपत आहे. एकीकडे सरकाराने मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली असली तरी हजारो मजूर अजूनही पायी प्रवास करत आहेत. अशाच एका उत्तर प्रदेशातील गोंडा येथे पोहचण्यासाठी निघालेल्या तरुणांचा वाटेतच मृत्यू झाला. मुंबईहून उत्तर प्रदेशमधील गोंडा हे शहर 1493 किमी अंतरावर आहे. 4 मजूरांनी पाच दिवसांआधी पायी प्रवासास सुरुवात केली. मृत तरुणाचा भाऊ मोहम्मद शकील यांनी आज तकला दिलेल्या माहितीत, 4-5 दिवसांआधी पायी प्रवासाला सुरुवात केली. काही वेळा ट्रकमधून काही अंतर प्रवास केला. तर इतर वेळी चालत. काही वाहनचालकांनी आमच्यावर दया दाखवत लिफ्ट दिली. मात्र त्यानंतरही पायी प्रवा...

जीवावर उदार होऊ नका..मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

Image
जीवावर उदार होऊ नका..मृत मजुरांच्या कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असं आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबई, 8 मे:  औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात, यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हेही वाचा..  अखेरचा ठरला प्रवास..पायी घरी निघालेल्या 16 मजुरांना वाटेत मृत्यूनं असं गाठलं! शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्...

पुणेकरांसाठी पुढचा आठवडा खऱ्या परीक्षेचा; अजित पवार करणार लॉकडाऊन कडक

Image
पुणेकरांसाठी पुढचा आठवडा खऱ्या परीक्षेचा; अजित पवार करणार लॉकडाऊन कडक 10 मे ते 17 मे पर्यंत कंटेन्मेंट झोनमध्‍ये टाळेबंदीची (Lockdown) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या आहेत. पुणे, 8 मे :  पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री आणि पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आरोग्‍य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्‍त्‍वाचे शहर आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलीस व...

शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Image
शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, 9 मे:  राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चालू  शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन  विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे. शाळांनी वार्षिक फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. फी वाढीबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजारास जागतिक महामारी घोषित केलं आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अमंलबजावणी सुरु आहे. त्याचबर...