नालासोपाऱ्यात भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावाचा हल्ला स्थलांतरितांना गावी जाण्यासाठी भरावा लागणारा ऑनलाइन फॉर्म भरून न दिल्याच्या कारणावरून नालासोपाऱ्यात एका भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावानं दगड, विटांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३० ते ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे : गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून न दिल्याच्या कारणावरून नालासोपाऱ्यातील एका भाजी व्यापाऱ्याच्या घरावर जमावानं हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. लोखंडी रॉड, दगड आणि विटा घेऊन जमावानं व्यापाऱ्याच्या घराला लक्ष्य केलं. या हल्ल्यात सहा वर्षांच्या मुलासह दोघे जखमी झाले आहेत. वसई गाव पोलिसांनी या प्रकरणी ३० ते ३२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात नालासोपारा पश्चिमेकडच्या कळम गावातील काही लोक आहेत. हल्लेखोरांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 'रेल्वेनं अद्याप स्थलांतरितांना कुठलीही सवलत दिलेली नाही' ब्रिजेश चौहान (३०) असं हल्ला झालेल्या भाजी व्यापाऱ्याचं नाव आहे. तो नालासोपारा प...
Comments
Post a Comment